मंगळवार, २७ जून, २०१७

कर्जमाफी 3


     किती दिवस आपण सारे कर्जमाफीचे तुणतुणे वाजवत बसणार?
किती दिवस कांग्रेस कांग्रेस भाजप भाजप खेळत बसणार?
संघीय आणि पुरोगामी मुखवटे इतके प्रबळ झाले की अर्ध्याअधिक ग्रामीण भारताचा जीवन मरणाचा प्रश्नसुद्धा मरणासन्न झालाय?
रोज अजून किती दिवस शेतकरी आत्महत्या करणार आणि शेती करत करत शेतकरी रोज थोडे थोडे मरणार?
राजकीय व्यवस्था; सामाजिक व्यवस्था; आर्थिक व्यवस्था; प्रशासन;समाज कोण नेमकेपणाने जबाबदार आहे?
नेमके उपाय काय आहेत?
   या सर्व प्रश्नांची उकल न होण्याची एक अदृश्य आणि गुंतागुंतीची व्यवस्था तयार झालीय......
उदाहरण घ्यायचं म्हंटल तर 2009 साली निवणुकीपूर्वी शिवसेनेने आत्महत्या "हब" विदर्भ आणि मराठवाडा कर्जमाफीवरून पिंजून काढला होता. नंतर अगदी न आढेवेढे घेता सरसकट कर्जमाफी झाली.पण शेतीचे मूलभूत प्रश्न सुटेल नाहीत. मग कर्जमाफी मागणारी शिवसेना चुकीची होती की कर्जमाफी देणारे upaसरकार जबाबदार होते.
  याचा अर्थ असा नाही की कर्जमाफी ने काहीच साध्य झाले नाही. मुळातच कर्जमाफी हा कधीही दूरगामी उपाय असू शकत नाही. कर्जमाफी हा तात्पुरता उपाय आहे. व तो आवश्यक आहेच. पण त्याबरोबर शेतीसाठी व शेतीतून उत्पादित मालासाठी पायाभूत सुविधा निर्मिती गरजेची आहेत व ती प्राधान्याने करणे गरजेचे आहे. व या दृष्टीने विचारदेखील करणारी सरकारे या देशात नाहीत व गेल्या 20-25वर्षांत ही न्हवती असेच म्हणावे लागेल... जो कांद्याचा वांदा नव्वदीच्या दशकात होता तीच दुर्दशा आजही 2017साली कायम आहे... अशी उदाहरणादाखल कितीतरी पिके अभ्यासता येतील. परिस्थिती थोड्याफार फरकाने जैसे थे आहे. याचा अर्थ सरकार आणि प्रशासकीय व्यवस्था शेती समस्यांवर प्रभावी उपाययोजना करू शकली नाही. आणि तरीही बरेच राजकीय बुद्धी अभिजन तुमच्या कार्यकाळात असे आमच्यावेळी तसे अश्या प्रकारच्या नाकदुऱ्या काढत असतात आणि त्यांची दोन्हीकडील शेवटातली शेवटची पिलावळ देखील रस्त्यावरच्या श्वानासारखी भो भो करत असतात.
इथे  आपल्या घरावर हत्ती चढून गेला तरी आपण शेजारणीच्या अंगणात मुंग्या उकरत बसलोय याचेही भान या पिलावळीतल्या नवमाध्यमी लोकांना राहिले नाही.
आजकाल सरकारे विरोधी पक्ष यांचादेखील ध्येयधोरणे कार्यक्रम अशी मूठभर लोकं ठरवू लागलीत. ही अश्या जातकुळीची पाळेमुळे खणल्याशिवाय शेती प्रश्नाचे गांभीर्य वाढणार नाही. असो मूळ विषयांवर येऊ...
अपयशी राजकीय,सामाजिक, आर्थिक,प्रशासकीय व्यवस्था इथून पुढे शेती प्रश्न सोडवेल असे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल.
यासाठी  शेतीसाठी समाजातील लोकांच्या विचारपद्धतीत बदल गरजेचे आहेत.
मध्यंतरी शेतकरी संपावेळी काही शहरी लोकांच्या तसेच ग्रामीण लोकांच्या परस्पर विरोधी अतिरेकी प्रतिक्रिया पाहिल्या तर  समाज अतिमहत्त्वाच्या प्रश्नाचे आकलन कोणत्या पद्धतीने करतो हे दिसून येते...
त्यामुळे शेतीप्रश्न सुटण्यासाठी कर्जमाफीच्या आधीही लोकांची डोकी, विचारपद्धती दुरुस्त करण्याची गरज आहे.
नाहीतर राजकारणी, प्रशासन, अर्थव्यवस्था ह्या साऱ्या गोष्टी लोकातूनच,समाजातूनच सुरू होतात, त्यामुळे बाकी व्यवस्थापेक्षा समाज नावाची व्यवस्था जास्त जबाबदार असते.....
   विचार करा नाहीतर हत्ती चढून जाईल पण शेजारणीच्या अंगणातल्या मुंग्या उकरायचे काही संपणार नाही।।।।।।।।।।।।।

शुक्रवार, १७ मार्च, २०१७

कर्जमाफी२


कर्जमाफी२

एकूणच सद्यस्थितीत शेतकऱ्यांच्या व शेतीच्या सर्व समस्यांवर उपाय जर कर्जमाफी नसेल तर ते काय असतील याचा उहापोह गरजेचा आहे.
सर्व प्रथम शेतकरी व त्या संबंधीत प्रशासकीय व्यवस्था यांचा परस्पर संबंध तपासला पाहिजे.आजही वास्तवात पीकपध्दती झपाट्याने बदलत असताना सरकारदरबारी त्याची वर्षातुन एकदाच नोंद होते.( वास्तव आहे, तलाठी कार्यालयात याचा आपण अनुभव घेतला असेलच.. कायदा कदाचित वेगळा असेल.) याचा अर्थ आज बाजारु अर्थव्यवस्थेत क्षणोक्षणी बदल होत असताना,वैश्विक हवामान बदल शेतात धुडगूस घालत असताना आहे त्या पीकाची नोंद मात्र अतीढीम्म कार्यपद्धतीने होते. सध्या अस्तित्वात असलेली पीक नोंद पध्दती, पीकमोजमाप पध्दती(आणेवारी) ह्या ब्रिटिशकालीन साच्यातील आहेत. आज तंत्रज्ञानाच्या युगात,जिथे गावानुसार पर्जन्यमान बदलते. तिथे हे बदल टिपायला कोणतीही अत्याधुनिक व्यवस्था आपला समाज,राजकीय व्यवस्था निर्माण करु शकला नाही.
याचा अर्थ अगदि सरळ व स्पष्टपणे कोणत्याही शेतीविषयक उत्पादनाचा,शेतिविशयक आपत्तीचा अचूक अंदाज कोणत्याही सरकारी अथवा खाजगी व्यवस्थेकडे नसतो.
खरी अडचण इथेच आहे.जर आपल्याकडे पीक लागवड,पीकाचे अंदाजे उत्पादन,पीकाचे लागवड क्षेत्र आदींची योग्य माहिती नसल्यामुळे उत्पादन व मागणी यातील सम्नवय बिघडतो. त्यामुळे अचानक शेतीमालाची भाववाढ, भाव कोसळने आदी प्रकार नित्यनेमाने घडत असतात. मध्यमवर्ग हा उत्तम मतपेढी असल्याने भाववाढ झाली की सरकार कृत्रिमपने भाव खाली आणून ठेवते. व शेतिमालाचे भाव पडले कि आपोआप महागाई दर खाली येतो परिणामी दोन्ही वेळी शेतकरीच भरडण्याची प्रक्रिया घडवून आनली जाते.
शेतीमालाचे भाव कृत्रिमरितीने नियंत्रित करणे हे कोणत्याही सरकारसाठी सोयीचे असते.कारण आजमितीला शेतिला खरी गरज आहे ती व्यवस्था ,मूलभूत सुधारणांची.व ते करणे प्रचंड कष्टाचे कार्य आहे. त्यापेक्षा सरकार नेहमीच सोपा पर्याय अवलंबवत असते.
शेतकऱ्यांना ह्या दुष्टचक्रातुन सोडवायचे असेल तर फार मोठ्या मानासिक,सामाजिक, आर्थिक क्रांतीची गरज निर्माण झाली आहे.
कारण सरकार नेहमीच समाज,समाजाची मानसिकता यांचे प्रतिनिधित्व करत असते.
एकूणच शेतकऱ्यांना नुसतीच कर्जमाफी नाही तर क्रांती ची गरज आहे, जी घडवेल मूलभूत बदल..............
पूर्ण.........

कर्जमाफी१

कर्जमाफी हा मुद्दा सत्ताधारी,विरोधक आणि राजकारणी हुकुमाच्या एक्कासारखे यथोचितपणे वापरत असतात.याचा आपण वारंवार अनुभव घेतच असतो. कर्जमाफी झाली की शेती व शेतकऱ्यांच्या सर्व समस्या एका फटक्यात सुटतील अश्या आविर्भाव समाजातील काही लोक आहेत. व कर्जमाफी करुन शेतकऱ्यांचा काहीही फायदा होणार नाही.असेही काही लोकांना वाटते. पन वास्तव नेमके काय आहे याचे विश्लेषण होने गरजेचे आहे...
मुळातच आजही भारतात वित्तीय समावेशन( मनमोहनसिंग पंतप्रधान असताना सुरु झालेले अन जनधन नावाने मोदी चालवत असलेले) पूर्णपणे झालेले नाही.ढीम्म प्रशासन आणि राजकीय उदासिनता यामुळे वित्तिय समावेशन( वंचित लोकांना वित्तीय संस्थाच्या छत्राखाली आणन्याचा कार्यक्रम) पूर्ण न होऊ शकल्याने आजही तळागाळातील लोकापर्यंत बॅंकिंग पोहचु शकले नाही. जनधन योजनेनंतर यातिल बराच अनुशेष भरला गेला. पन सर्वसामान्य गरजुसाठी अनुदान जमा होन्याचे साधन एवढाच वापर बॅंकिंगचा होतो हे वास्तव आहे.त्यामुळे आजही बॅंकिंग तळागाळातील लोकांसाठी परिनामकारक ठरत नाही. त्यामुळे वित्तगरज असलेला शेतकरी खाजगी पर्यायाकडे(सावकारी) ओढवला जातो.
गावात जर आपण तपासले तर बहुतांश कर्जप्रकरने हि सोसायटी अथवा जिल्हा सहकारी बॅंकेत असतात. व तेथे राजकीय हस्तक्षेप प्रचंड प्रमानात असतो. म्हणजेच जो शेतकरी राजकीयदृष्ट्या व्यवस्थेत असतो बहुतांशवेळा त्यालाच कर्जप्रकरने मंजूर होतात. तसेच राष्ट्रीयकृत बॅंकेकडून शेतीच्या तुलनेत इतर क्षेत्रात जास्त कर्जवाटप होते हे वास्तव आहे.
म्हणजेच सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी मुख्यप्रवाहातील कर्जव्यवस्था सहजतेने उपलब्ध नाही.
तसेच बहुतांश शेतकरी दैनंदिन व्यवहार रोखीनेच करतात.(नोटाबंदीनंतर कदचित कमी झाले असतील). म्हणजे सामान्य शेतकरी वर्ग अजूनही वित्तिय समावेशनापासुन दुर आहे.
खरा घोळ इथेच आहे. शेतीसाठी जास्तीतजास्त वित्तिय गुंतवणूक गरजेची असताना वित्तिय संस्था शेती क्षेत्रात पूर्ण क्षमतेनुसार काम करत नाहीत. म्हणजेच बहुसंख्य शेतकरी हा मुळात कर्जापासुनच(शासकीय) वंचित आहे.
याचा अर्थ कर्जमाफी झाली तर काही शेतकऱ्यांना फायदा होइल पन उरलेल्या शेतकऱ्यांचे काय?
कर्जमाफी करुनही शेतकरी आत्महत्या थांबत नाहित हे आपन २००९च्या कर्जमाफीवरुन अनुभवले आहे. तरीही शेतकऱ्यांना आर्थिक सक्षमता प्रदान करन्याएवजी अनुदाने,आपल्या राजकीयसोयीने कर्जमाफी मागणी अथवा निर्णय अश्या गोष्टी राजकीय व्यवस्था स्वहीतासाठी वेळोवेळी वापरत असते.
त्यामुळे त्यातील राजकारण ओळखता आले पाहिजे.
कर्जमाफी करुन कधीही शेतीची दुरावस्था संपणार नाही तर शेतीतील मूलभूत गरजांकडे गुंतवणूक वाढली पाहीजे.
अपूर्ण......